गुरुवार, २८ मार्च, २०१९

पाणीदार अवलिया : राजेंद्र सिंह राणा




शिवाजी विद्यापीठातील जलसंधारण कार्याला प्रत्यक्षात भेट देऊन प्रामाणिक भावनेने मत मांडणारे राजेंद्रसिंह राणा मनाला खूप भावले. या महान जलनेत्याने ज्या सहजपणे आपल्या भावना मांडल्या, ते पाहून ते नेते आहेत मात्र आजही त्यांच्यातील कार्यकर्ता जिवंत ठेवला, आहे याची खात्री पटली. हेच त्यांचे मोठेपण आहे, असे मला जाणवले. मी २०१५च्या जुलैमध्ये 'कृषीक्रांतीचे शिलेदार' या लेखमालेत 'लोकमत' कोल्हापूरमध्ये राजेंद्रसिंह यांच्यावर लिहिलेला एक छोटेखानी लेख आणि शिवाजी विद्यापीठ-जलयुक्त विद्यापीठास त्यांनी दिलेल्या भेटीतील काही छायाचित्रे येथे प्रसिद्ध करत आहे.. धन्यवाद
------------------------------------------------------------------------------------ 


जागतिक ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी शिवाजी विद्यापीठास काल दिनांक २७ मार्च २०१९ रोजी भेट दिली. मी राजेंद्रसिंह यांना प्रथमच भेटलो. पर्यावरणशास्त्र विभाग, तंत्रज्ञान अधिविभाग आणि असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्स यांच्या वतीने जलदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम हे निमित्त होते. या भेटी दरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. शिवाजी विद्यापीठात ते सकाळी सव्वादहाच्या सुमारास आले. त्यांना एरव्ही अनेकदा दूरचित्रवाणीवर पाहिले होते. ऐकले होते. मात्र त्यांना आज प्रथमच पाहात होतो. एका जिंदादिल, पाणीदार व्यक्तीमत्त्वाचे दर्शन झाले. आपण एका मनस्वी माणसाला भेटल्याचे जाणवले. ते विद्यापीठात आल्यानंतर पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक पी.डी. राऊत यांनी विद्यापीठातील पाणी योजना पाहू या का? अशी विचारणा केली आणि त्यांनी आनंदाने होकार दिला.  
     त्यानंतर त्यांच्यासमवेत उदय गायकवाड आणि राऊत सर, कुलसचिव नांदवडेकर सर यांच्यासमवेत सर्वत्र पाहणी झाली. संगीतशास्त्र विभागाशेजारचा तलाव, जलशुद्धीकरण (आरओ) प्रकल्प, त्याशेजारील विहीर, शिंदे विहीर, सुतार विहीर, शेजारील शेततळी हे सर्व पाहिले. हे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचे कौतुक स्पष्ट दिसत होते. शिंदे विहिरीतील पाणी पूर्ण काढले असल्याने त्यातील झरे स्पष्ट दिसत होते. ते पाहून त्यांचा आनंद द्विगुणीत झाल्याचे दिसत होते. 'आडवे पाण्याचे झरे हे पाण्याची पातळी चांगली वाढली लक्षण आहे. सुंदर!' हे त्यांचे उद्गार होते. आरओ प्लँटजवळील नारळाची बाग पाहूनही त्यांनी कौतुक केले. आरओचे वाया जाणारे पाणी वापरून दोनशे नारळांची बाग फुलते आहे.          त्यांनी भावी काळात सुतार विहिरीच्या खालच्या बाजूस आणखी एक विहिर खोदावी, अशीही सूचना केली. महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठाने त्या भागात विहिर खोदण्याचे पूर्ण नियोजन केले असून याच उन्हाळ्यात ती पूर्ण करायचा विद्यापीठाचा मानस आहे. आणि तो विद्यमान कुलगुरू प्रा. देवानंद शिंदे सरांच्या नेतृत्त्वाखाली पूर्णही करण्याचे नियोजन आहे.
त्यांना विद्यापीठाचे भावी नियोजन हे माहित नव्हते. मात्र केवळ सध्याची परिस्थिती पाहून
पाहून त्यांनी केलेली सूचना ही त्यांच्या अभ्यासाची साक्ष देत होती. त्यांचे शब्द म्हणजे शिवाजी विद्यापीठाचे जलसंधारणाचे कार्य योग्य दिशेने चालले आहे, याची पावती देणारे होते. आम्हाला आमची वाटचाल योग्य दिशेने चालली आहे, आणि पुढे जा, असे सांगणारे होते. हे निश्चितच प्रेरणादायी आहे.
       एक तासाचा अवधी त्यांच्यासमवेत घालवता आला, हे माझे भाग्य. त्यांच्या त्या सहवासात त्यांच्यातील मोठेपण हे प्रत्यक्ष अनुभवता आले. ते नेते आहेत, जगाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. ते जगाला या विषयावर सल्ला देतात. मात्र सहज बोलल्यानंतर, जलसंधारणाच्या शिवाजी विद्यापीठातील प्रत्येक जागेला प्रत्यक्षात भेट देऊन प्रामाणिक भावनेने मत मांडणारे राजेंद्रसिंह राणा मनाला खूप भावले. या महान जलनेत्याने ज्या सहजपणे आपल्या भावना मांडल्या, ते पाहून ते नेते आहेत मात्र आजही त्यांच्यातील कार्यकर्ता जिवंत ठेवला, आहे याची खात्री पटली. हेच त्यांचे मोठेपण आहे, असे मला जाणवले.
              मी २०१५च्या जुलैमध्ये 'कृषीक्रांतीचे शिलेदार' या लेखमालेत 'लोकमत' कोल्हापूरमध्ये राजेंद्रसिंह यांच्यावर लिहिलेला एक छोटेखानी लेख आणि शिवाजी विद्यापीठ-जलयुक्त विद्यापीठास त्यांनी दिलेल्या भेटीतील काही छायाचित्रे येथे प्रसिद्ध करत आहे. 

राजेंद्र सिंह राणा

     पाण्याला जीवन म्हणतात. प्रत्येक जीवाचे जगणं किंवा मरणे पाण्यावर अवलंबून आहे. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. तर इतर सर्व सजीव वनस्पती किंवा वनस्पतीवर आधारीत अन्य जीवांचे भक्षण करून भूक भागवतात. अन्न स्वतः तयार करणा-या वनस्पती असोत, त्यांच्यावर अवलंबून असणारे शाकाहारी जीव असोत किंवा मांसाहारी प्राणी सर्वांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याशिवाय जगणे अक्य आहे. या पाण्याचे महत्व ओळखून जलसंधारणासाठी आयुष्य खर्ची घालवण्यास एक युवक तयार झाला आणि राजस्थानच्या रखरखीत वाळवंटात नंदनवन फुलवले असे हे आनंददायी व्यक्तीमत्व म्हणजे डाॅ. राजेंद्र सिंह! भारताचा पाणीवाला बाबा!
                उत्तर प्रदेशातील बागपत जिल्हयातील दौला या गावात गस्ट, १९५९ रोजी राजेंद्र सिंह यांचा जन्म झाला. जमिनदार घराणे होते. ६० एकर क्षेत्रात त्यांचे वडील स्वतः शेती करत असत. त्याच दौला गावात राजेंद्रसिंह यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. रमे र्मा नावाचे गांधीजींचे अनुयायी यांनी ग्रामसुधाराबाबत राजेंंद्रसिंहांच्या मनावर खोल परिणाम केला. त्याचप्रमाणे प्रतापसिंह या त्यांच्या इंग्रजीच्या शिक्षकानेही प्रभावित केले. शालेय शिक्षण संपल्यानंतर त्यांनी आयुर्वेद शिक्षण घेण्यास सुरवात केली. बी.ए.एम.एस. ही पदवी १९७१ मध्ये घेतली. त्यानंतर एम.ए.साठी हिंदी वियाकरीता प्रवे घेतला. या काळात जयप्रका नारायण यांचा आणि विद्यार्थी चळवळीचा संपर्क आला. छात्र युवा संघर्ष वाहिनीचे ते नेते बनले. मात्र जयप्रकाजी आजारी असताना अंतर्गत राजकारणाचा राजेंद्रसिंह यांना उबग आला.
                सन १९८० मध्ये ते शासकीय सेवेत रूजू झाले. त्यानंतर जयपूर जवळ प्रौढ शिक्षा वर्गाचे शिक्षक म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. याच काळात तरूण भारत संघटनेची त्यांना ओळख झाली. ही प्रामुख्याने आधिकारी आणि विद्यार्थ्यांची संघटना होती. १९८४ मध्ये ते या संघटनेचे सचिव झाले. त्यांनी अनेक प्रश्नाकडे सदस्यांचे लक्ष वेधले. संपूर्ण कार्यकारिणीने राजीनामा देवून संपूर्ण संघटना राजेंद्र सिंहांकडे दिली. ते खेडयातून फिरले. त्यांनी ग्रामीण जीवनाचा अभ्यास केला आणि ग्रामीण जीवन सुधारण्यासाठी कार्य करण्याची त्यांची मनिषा आधिक दृढ झाली. मनात एक आराखडा तयार होवू लागला. मात्र नोकरीत वरिष्ठांचे या सुधारणावादी विचाराप्रती असणारे औदासिन्य पाहून त्यांनी नोकरी सोडली.
           घरातील सर्व साहित्य विकून रू. २३०००/- ची पुंजी घेवून १९८५ साली हा युवक चार मित्रासह एका बसमध्ये चढला आणि शेवटच्या गावाचे तिकीट काढून किशोरी या थानागाझी तालुक्यातील गावात उतरला. योगायोगाने तो दिवस ग्रामविकासाचे स्वप्न पाहणा-या महात्माजींची जयंती क्टोबर, १९८५ हा होता. भिकमपुरा गावातील रहिवाशानी त्यांना स्विकारले. राजेंद्रसिंहानी तेथे छोटेखानी दवाखाना सुरू केला. इतर चाैघे शाळेत शिकवू लागले. धान्याचे कोठार म्हणून एकेकाळी प्रसिध्द असलेल्या अलवार जिल्हयाचा तो भाग होता. आता रूक्ष वाळवंट निर्माण झाले होते. वयस्कर लोकांशी चर्चा केल्यानंतर जोहड नामशेष झाल्याने हे घडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जोहडव्दारा होणारा जलसंचय न होणे आणि बोअरवेल लावून पाणी उपसा जास्त झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खूपच खालावली होती. अरवली पर्वतावरील वृक्षांची हानी झाली होती. गावातील जेष्ठ मंगू लाल पटेल यांच्या सहमतीने त्यांनी जोहडची पुनर्निमिती केली. गावातील काही युवकांच्या मदतीने गोपालपुरा जोहड पूर्ण झाला. पावसाळयात जोहडही आले आणि गावातील विहीरीत पाणी आले. हे पाहून वनखात्याने त्यांना अभयारण्यात काम करण्यासाठी बोलावले. तरूण आश्रम, किशोरी, भाकमपुरा हा तरूण भारत संघाचे कार्यालय बनला. या यशानंतर गावोगावी फिरून आणि जनजागृती करून त्यांनी जलसाक्षरता घडवले आणि पडणारे पाणी थेंब न थेंब वापरण्यास जनतेला प्रवृत्त केले. लोकांना श्रमदानातून जोहड बांधण्याचा मुलमंत्र दिल्याने राजस्थानची पाणीपातळी वाढली. जोहड निर्मितीमुळी अरवली नदी वाहू लागली. आजवर अनेक बंधारे बांधणारे राजेंद्रसिंह हे स्टाॅकहोम वाॅटर पुरस्काराचे मानकरी आहेत. आता पुढील काळात जल जन जोडो आभियान ते राबवत आहेत. त्यांच्या या राजस्थान मधील यस्वी प्रयोगामुळे देभर नव्हे, तर विश्वभर त्यांची पाणीवाला बाबा म्हणून ओळख निर्माण झाली. ज्याने राजस्थानची भूमी पुन्हा हिरवीगार केली.

शुक्रवार, १ मार्च, २०१९

'निखळ संवेदनांचा वैशिष्ट्यपूर्ण अविष्कार'

संवेदना हे मानवाच्या जीवंतपणाचे लक्षण. जाणवलेल्या संवेदनाबाबत व्यक्त होणे ही गरज. व्यक्त होण्याच्या पद्धती म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. मात्र या संवेदनाना शब्दरूप देऊन सकारात्मकता जपून, तरूणाईला विचार करायला लावणारे एक पुस्तक नुकतेच वाचायला मिळाले.  'निखळ... जागर संवेदनांचा' हे आलोक जत्राटकर, जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ यांचे पुस्तक. हे पुस्तक वाचले आणि मला व्यक्त व्हावेसे वाटले आणि 'दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका' या नियतकालीकात ते प्रकाशित झाले. 'दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिके'च्या सहकार्याने ते आपल्यासाठी येथे प्रसिद्ध करीत आहे. धन्यवाद ..... व्ही. एन. शिंदे
------------------------------------------------------------------------------------ 
आलोक जत्राटकर यांचे "निखळ जागर संवेदनांचा" हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. हे पुस्तक म्हणजे अप्रकाशीत साहित्य नाही. यातील बरेच लेख 'कृषीवल' या कोकण भागात प्रामुख्याने लोकप्रिय असलेल्या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत. काही लेख हे त्यांच्या ब्लॉगमध्ये प्रकाशीत केले आहेत. ते सध्या शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. यापूर्वी त्यानी शिवाजी विद्यापीठाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त प्रकाशीत केलेल्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथा"चे सहसंपादन केले आहे. तसेच त्यानी "कोल्हापूरचं पर्यटन" या पुस्तकाचेही सहसंपादन केले आहे. आज प्रकाशीत झालेले "निखळ जागर संवेदनांचा" हे त्यांचे स्वतंत्र साहित्यकृती म्हणून पहिलेचं पुस्तक आहे. या पुस्तकाला वरिष्ठ पत्रकार साहित्यिक कवी विजय चोरमारे यांची ओघवती प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकातील लेख हे त्यांच्या मनात निर्माण झालेल्या तरंगाचे शब्दरूप आहे. हे तरंग तत्कालीन परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात उठत असतात. मात्र त्या तरंगाना शब्दात बांधण्याचे कौशल्य फारच कमी लोकाकडे असते. त्या कौशल्य असणाऱ्या लोकातील फार कमी लोक प्रत्यक्ष असे शब्दात लिखीत स्वरूपात मांडतात. हे काम आलोक जत्राटकर यानी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले आहे. कृषीवलचे तत्कालीन संपादक संजय आवटे यानी आलोक यांना सदर लेखनाची जबाबदारी दिली आणि त्यानी ती पार पाडताना समकालिन अनेक वैयक्तिक, सामाजिक, वैज्ञानिक घटनाबाबत मनातील तरंग शब्दरूपात मांडले. हे वेळोवेळी प्रकाशीत केलेल्या लेखनाचे आज पुस्तकरूपात आपल्या साक्षीने प्रकाशीत झाले आहे.
       'निखळ' हे पुस्तक अनेक कारणानी वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी आहे. सर्वसामान्याना आपली भाषा वाटेल, अशा स्वरूपाचे हे लेखन आहे. यामध्ये विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे, मानवी भावना आहेत, मनातील विचारांचे काहूर आहे, मानवी स्वार्थ आणि त्यातून पैसा कमावण्यासाठी चोखाळलेले नीतीशून्य मार्ग आहेत. सारे काही आहे. ज्या वेळेस समाजातील चूकीचे वागणारा कोणी येतो, तेव्हा त्यांना अशाच व्यवसायातील नीतीवान चेहरा आठवतो. यातून त्यांची सकारात्मकता प्रकर्षाने जाणवते. त्यांचा आशावादही त्यांच्या लेखनातून जाणवतो. सकारात्कता, आशावाद, कृतज्ञता ही सर्व मूल्ये अनेक लेखात जागोजागी भेटतात. हे त्यांचे लेखन तिशीतील असावे. या वयात युवक बंडखोर असतात. मात्र त्यांचे लेख बंडखोरीची भाषा करत नाही, तर ती हळूवारपणे बदलाची आशा व्यक्त करतात. खरेतर या वयात बंडखोर भाषेत अनेकांना व्यक्त व्हायला आवडते, मात्र आलोक यांच्या लेखनात समंजसपणाची झलक आणि आशावाद जागोजागी दिसतो. याला कारण त्यांच्या मातापित्यांच्या शिक्षकी पेशात असावे. आई आणि वडील शिक्षक असल्याने त्याना वेगळ्या अंगाने प्रश्नाकडे पहाण्याची सवय लागली असावी. तो सुंस्कृतपणा त्यांच्या लेखनात उतरला आहे. या वयात असणारी समज त्यांच्या लेखनाच्या प्रांतात उज्ज्वल भविष्याची साक्ष देते.
       त्यांच्या आजोबाना त्यांनी हे पुस्तक अर्पण केले आहे. त्यांच्या लेखणीत उतरलेल्या गुणामध्ये आजोबांच्या संस्काराचाही वाटा असावा, असे अर्पणपत्रिका वाचली की पटते. आजोबांनी आपल्याला राम-कृष्णापासून बुद्ध, फुले, आंबेडकरापर्यंत साऱ्यांशी मला नकळत जोडण्याचे कार्य केले, असे लिहितात. या सर्व संस्काराचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. त्यामुळे त्यांचे लेखन प्रवाही असले तरी खळखळाट करत वाहणारे नाही, तर मधूर संगीताची लय पकडणारे, झुळूझुळू वाहणाऱ्या मनमोहक झऱ्यासारखे वाटते. झरा जसा मातीची धूप होऊ न देता, आजूबाजूच्या परिसराला सुंदर बनवत जातो, तसेच हे लेखन आपल्या मनाला विव्हळ किंवा बंडखोर न बनवता विचार करायला भाग पाडते. त्यावर सकारात्मक विचार करायला भाग पाडते.
       हे पुस्तक लालित्यपूर्ण भाषेत मानवी मनातील स्पंदने आपल्यासमोर आणते आणि म्हणूनच त्याचे शीर्षक "निखळ जागर संवेदनांचा" हे अत्यंत समर्पक आहे. हे सर्व लेखन प्रवाही आहे. वाहत असताना ते कोठेही वाहवत जात नाही. उलट अनेक ठिकाणी ते एक वेगळी दृष्टी देण्याचा वेगळा विचार देण्याचा प्रयत्न करते. लेखकाचे हे फार मोठे यश आहे. निर्भया प्रकरणात ते म्हणतात, "गुन्हेगाराना शिक्षा होणे म्हणजे प्रकरणाचा शेवट नव्हे, तर ती सुरूवात झाली पाहिजे, बलात्काराच्या भावनेला सुरूंग लावण्याची. अत्याचाराचा विचार करणाऱ्याच्या मनात कायद्याचे भय निर्माण झालंच पाहिजे". 'गुन्हा होऊच नये म्हणून समाज परिवर्तन विचारातील परिवर्तन व्हावे', असा आशावाद ते बाळगतात. पुरूषी अहंकाराच्या मानसिकतेला उद्ध्वस्त करणे हे त्याना अपेक्षित आहे.  
       या पुस्तकातील "सोन्याचा दिवस" हा पहिला लेख आणि शेवटून दुसरा लेख "मरणाने सुटका केली" हा एकाच मित्राच्या जीवनातील दोन घटनावर आधारित आहेत. मैत्री कशी असावी, मैत्री निभावताना आलेली बंधन, मानवी स्वभाव आणि मनातील अनेक स्पंदने त्यानी अचुकपणे मांडली आहेत. ही मांडत असताना मैत्रीत ज्यांच्यामुळे मर्यादा आली, त्यांच्याबाबतची वक्तव्य ही त्यांच्या लैखनीतील सुजाणतेची साक्ष देतात. त्यात त्यांनी कोणाचा तिरस्कार केला नाही, तर त्या व्यक्तीच्या भूमिकेतून पहायचा प्रयत्न केला आहे. हे फार कठीण असते. अनेक लेखक एखाद्या घटनेकडे आपल्याला वाटते तेच बरोबर आणि बाकी सर्वजण चूक असे मांडायचा प्रयत्न करतात. मात्र अशी भावना आलोक यांच्या लेखनात कोठेही दिसत नाही. मित्राच्या लग्न जमल्याची बातमी आणि त्याची आत्महत्या या दोन टोकाच्या घटना मांडताना त्यांच्या मनातील भावना पूर्णत: वेगळ्या आहेत. तरीही त्या शब्दात मांडताना त्यांच्यातील लेखक हा तितक्याच सक्षमपणे लिहित राहतो.
       "सत्यनारायणाची क्रांतीकथा" या लेखात त्यानी सॅम पित्रोदा यांच्या क्रांतीकारी कार्याची ओळख करून दिली आहे. या त्यांच्या लेखात शोध पत्रकारितेचे दर्शन घडते. आज सॅम पित्रोदा यांचे खरे नाव अनेकांना अभावानेच माहीत असेल. मात्र या मानवाने देशासाठी दिलेले योगदान, त्याचे महत्त्व हे अगदी सहजपणे त्यांनी मांडले आहे. त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान त्यांनी त्यांच्याच भाषेत अगदी समर्पकपणे मांडले आहे. जाता जाता त्यांनी उथळ पाण्याला खळखळाट का असतो? याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमीवर वाचकाना सॅम पित्रोदा यांचे कार्य किती महत्त्वाचे आणि मोठे आहे हे अन्य काही न लिहिता समजते आणि हे त्यांच्या लेखनाचे यश आहे.
       "डिसलायनेशन" हा लेख आजच्या पाणीप्रश्नावर आजही तितकाच महत्त्वाचा ठरतो. समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य करता आले तर पाणी प्रश्नाची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होऊन जाईल. हा मुद्दा एक राजकीय नेता विचारात घेतो आणि त्यावर विचार करू लागतो. त्यानुसार विचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देतो. या घटनेतून लेख सुरू होतो. यामध्ये दिलेले संदर्भ अत्यंत महत्त्वाचे आहेत. असे प्रयोग कोठे होतात. त्यांची क्षमता, अशा प्रयोगांना येणारा खर्च याची सर्वंकश माहिती देण्याचा प्रयत्न लेखातून झाला आहे. या लेखातील माहिती एका विज्ञानाच्या अधिकारी पुरूषाने सांगावी तशी मांडली आहे.
       कृतज्ञता ही गोष्ट आजच्या युगात दुर्मिळ होत चालली आहे. या अशा युगात आपल्या गुरूजीची आठवण ते लिहितात. त्यांच्या मनातील स्पंदने आज ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यावरील लेखाचे शीर्षकच "गुरूजी, तुम्ही होता म्हणून..." असे आहे. या लेखात आपले तिसरी आणि चौथीतील गुरूजी भूपाल ढोले यांच्याबद्दल लिहिले आहे. हे लिहिताना शिस्तप्रिय गुरूजीच्या मनातील हळूवार कप्पे त्यानी अलगद उलगडले आहेत. शिक्षकांच्या ज्या कृतीचे आकलन बालपणी झाले नव्हते, त्या कृती आज त्यांच्या लक्षात आल्याचे, त्यानी प्रांजळपणे नमूद केले आहे. शेवटी गुरूजी नसते तर आपण आज जेथे आहोत तेथवर आलो असतो का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी न देता गुरूजी तुमच्यामुळेच आपण येथवर पोहोचलो, ही सकारात्मक कबूली दिली आहे. ही कृतज्ञतेची भावना दिवसेदिवस दुर्मिळ होत चालली आहे. ही सकारात्मकता लेखकाची सर्वात मोठी आणि जमेची बाजू आहे.
       "आशेचे दिप तेवू द्या मनी" या लेखातील आशावाद आणि सकारात्मक भावना अत्युच्च पातळीवर पोहोचली आहे. वाईट गोष्टीवर ते टीका करत बसत नाहीत तर वाईट आहे म्हणून चांगले महत्त्वाचे असे ते म्हणतात. चांगल्या गोष्टीकडे पहायला ते सांगतात. चांगले वाईट व्यवस्थेमध्ये नाही तर आपल्या मनात असते. मनातील वाईट काढून टाकले की चांगले उरते. जुन्या नव्याचा विचार करताना जुन्यातील चांगले घेण्याची त्यांच्या मनाची तयारी आहे. शिवाजी महाराजांकडे ते वेगळ्या नजरेने पाहतात. शिवरायाचे नाव घेऊन उपयोग नाही तर त्यांचे गुण अंगिकारले पाहिजेत, असा त्यांचा रास्त आग्रह आहे. शिवरायांचे मोठेपण शोधण्याचा त्यानी केलेला प्रयत्न हा अत्यंत प्रामाणिक आणि सर्वांनी आवर्जून वाचावा असा आहे.
       वेड्यांचे संस्कार, मनाची मशागत, खुर्ची डोक्यात शिरते तेव्हा असे एकूण बत्तीस वाचनीय लेख या पुस्तकात आहेत. यात काही मृत्यूलेखही आहेत. या सर्व लेखनाला एक वैयक्तिक स्पर्श आहे. मात्र त्यामुळे हे लेखन वैयक्तिक स्वरूपाचे झालेले जाणवत नाही. या लेखातील भावना या अनेकांच्या मनातील भावना आहेत. त्या शब्दबद्ध करून आपल्यासमोर आज पुस्तकरूपाने आल्या आहेत. वुई आर बिइंग वॉच्ड किंवा इंफोटेररिस्ट यासारख्या लेखात त्यानी नव्या युगाच्या हाका आणि त्यात आपली वर्तणूक यावर भाष्य केले आहे. अनेक विषयांना भिडणारे असूनही पुस्तकात एकजिनसीपणा आहे कारण यातील त्यांची मांडणी प्रामाणिक आहे. ती एका सूत्रावर आधारित आहे.
       हे पुस्तक युवकांसाठी विशेष महत्त्वाचे आहे असे मला वाटते. पुस्तक वाचून युवकांना चिंतन करावेसे वाटेल अशी मला आशा आहे. वृत्तपत्रलेखन हे साधारण समकालिन आणि तत्कालीन असते, चिरंतन मूल्य नसणारे असते, असे आपण मानतो. मात्र विषय जरी समकालिन असले तरी लेखनशैलीमुळे आणि विषयाच्या मांडणीमुळे ते चिरंतन साहित्य बनले आहे. युवकांना कायमस्वरूपी विचार करायला भाग पाडेल, असे हे लेखन झाले आहे.